
नवी देहली – देशातील सर्व लोकांना शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे; परंतु रस्त्यावर उतरून सामान्य लोकांसाठी अडचण निर्माण करता येणार नाही. आंदोलनाच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची किंवा भीतीचे वातावरण निर्माण करण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून चालू असलेल्या वादाशी संबंधित सुनावणीच्या वेळी म्हटले.
People have the right to protest through legal means; however, protests must not cause inconvenience to the public, observed CJI Surya Kant during the Supreme Court hearing on the dispute over the naming of the Navi Mumbai International Airport.
Lawful protest is a right, but… pic.twitter.com/8sLNEZ9N7E
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 21, 2026
याचिकेत दावा करण्यात आला आहे की, विमानतळाच्या नावावरून आंदोलन करणार्या तरुणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, लोकशाही व्यवस्थेत लोकांना आपल्या मागण्या मांडण्याचा आणि योग्य व्यासपिठावर म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. जर सरकारने त्वरित प्रतिसाद दिला नाही, तर लोकांनी सतत मागण्या मांडत रहाणे आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेत शेवटी सरकार आणि संबंधित अधिकारी यांना समजते की, एखाद्या सूत्रावर निर्णय घेणे आवश्यक आहे.
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !