आतंकवाद्यांना आश्रय देणे बंद केले नाही, तर पाकने ठरवावे की, त्याला भूभागाचा भाग बनायचे आहे कि इतिहासाचा ? – General Upendra Dwivedi

सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची पाकला चेतावणी

सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

नवी देहली – पाकिस्तानने जर आतंकवाद्यांना आश्रय देणे बंद केले नाही, तर त्याला ठरवावे लागेल की, त्याला भूभागाचा भाग बनायचे आहे कि इतिहासाचा ? अशी चेतावणी भारताचे सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकला दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने येथील माणेकशॉ सेंटरमधील सैनिकी कार्यक्रमात बोलतांना जनरल द्विवेदी यांनी ही चेतावणी दिली.

जनरल द्विवेदी पुढे म्हणाले की,

१. जर पाकिस्तानने त्याची रणनीती पालटली नाही, तर आगामी काळात भारतीय सैन्य ‘ऑपरेशन सिंदूर’पेक्षाही कितीतरी पटींनी अधिक कठोर आणि वेगवान प्रत्युत्तर देईल.

२. पाकिस्तानने शांतता आणि विकास यांचा मार्ग निवडायचा कि आतंकवादाला पाठिंबा देत रहायचे, हे ठरवले पाहिजे. भारताला नेहमीच शांतता हवी आहे; परंतु जर पाकिस्तानने आतंकवाद पसरवणे चालूच ठेवले, तर भारत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पहाणार नाही.

३. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास सैन्य अधिक वेगाने आणि अधिक जोमाने प्रत्युत्तर देईल. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सैन्यदल, वायूदल आणि नौदल यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचे प्रदर्शन झाले. देशात आतंकवादाच्या विरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबले आहे. सैन्य कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहे.