
‘सध्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती साधकांच्या श्रद्धेचे भंजन करून त्यांना साधनेपासून परावृत्त करण्यासाठी ‘शब्दशक्ती’द्वारे मोठ्या प्रमाणात सूक्ष्मयुद्ध करत आहेत. लिखाण आणि वाणी यांमधील शब्दांच्या माध्यमातून संस्था, संत आणि साधक यांविषयी नकारात्मकता पसरवली जात असल्याच्या घटना घडत आहेत. या सूक्ष्मातील लढ्यात वाईट शक्ती समाजातील विरोधक, तसेच नकारात्मक विचारांचा प्रभाव असलेले साधक यांना माध्यम करून त्यांचे लिखाण आणि वाणी यांतून अन्य साधकांमध्ये विकल्प निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. साधकाच्या श्रद्धेवर घाव घातला की, त्याच्या मनात विकल्प निर्माण होऊन त्याची साधनेत अधोगती होते.
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवणार्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींच्या षड्यंत्राला बळी न पडता जोमाने स्वतःची साधना वाढवा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.३.२०२६)
| सनातन संस्था, सनातनचे संत आणि साधक यांच्याविषयी विकल्प पसरवणारे आक्षेपार्ह लिखाण किंवा बोलणे कुणी करत असल्यास त्याविषयी आपल्या क्षेत्राच्या उत्तरदायी धर्मप्रचारक संतांना कळवावे.
– विश्वस्त, सनातन संस्था. |
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !