वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन परवाना रहित होणार !

नाशिक – केंद्रीय मोटार वाहन नियमात महत्त्वाचे पालट करण्यात आले असून त्यानुसार एखाद्या वाहनचालकाने एका वर्षात पाच किंवा अधिक वेळेस वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्याचा वाहन परवाना निलंबित किंवा रहित केला जाईल, अशी माहिती येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी दिली आहे. या अंतर्गत प्रत्यक्ष, तसेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंड आकारला जाईल.

‘नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. चलन विहित मुदतीत भरून पुढील कारवाई टाळावी’, असेही आवाहन करण्यात आले आहे.