
वावडुंगी (जिल्हा रायगड) – मुरुड भागातील रानात रानडुकरांच्या शिकारीसाठी बाँब पेरण्यात येतात. तेथेच रानात गावकरी गुरे चारायला नेतात. त्यांतीलच एका बैलाच्या तोंडात चारा खात असतांना बाँब आल्याने त्याचा स्फोट होऊन बैलाचा जबडा पूर्ण फाटला. बैलाचे मालक मधुकर भुवड हे बैलाची दुरवस्था पाहून प्रचंड दुःख झाल्याने जोरजोरात रडायलाच लागले.
गावकर्यांनी पोलीस आणि वन विभाग यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही शिकार्यांवर कारवाई होत नाही, असा आरोप केला आहे. ‘या बाँबमुळे एखादा माणूस घायाळ झाला, तर याचे दायित्व कोण घेणार ?’, असा चिंताजनक प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. या प्रसंगामुळे पोलीस आणि वनविभाग प्रशासन यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने तातडीने कारवाई करण्याची मागणी गावकर्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या