
वावडुंगी (जिल्हा रायगड) – मुरुड भागातील रानात रानडुकरांच्या शिकारीसाठी बाँब पेरण्यात येतात. तेथेच रानात गावकरी गुरे चारायला नेतात. त्यांतीलच एका बैलाच्या तोंडात चारा खात असतांना बाँब आल्याने त्याचा स्फोट होऊन बैलाचा जबडा पूर्ण फाटला. बैलाचे मालक मधुकर भुवड हे बैलाची दुरवस्था पाहून प्रचंड दुःख झाल्याने जोरजोरात रडायलाच लागले.
गावकर्यांनी पोलीस आणि वन विभाग यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही शिकार्यांवर कारवाई होत नाही, असा आरोप केला आहे. ‘या बाँबमुळे एखादा माणूस घायाळ झाला, तर याचे दायित्व कोण घेणार ?’, असा चिंताजनक प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. या प्रसंगामुळे पोलीस आणि वनविभाग प्रशासन यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने तातडीने कारवाई करण्याची मागणी गावकर्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
राजापूर तालुक्यात पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी करा !
विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करा ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची मागणी
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
Tukaram Mundhe Action : रुग्णालयातून औषधे खरेदी करण्याची सक्तीची केल्यास कारवाई होणार !
सहारनपूर (उत्तरप्रदेश) : ‘श्री गोगा मढी’ तीर्थक्षेत्राला मौजमजेचे केंद्र बनवल्यावरून विरोध !
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण