जळगाव येथे पहाटे ५ पासून पेट्रोलपंपांवर रांगा !

जळगाव – आखाती देशांतील युद्धामुळे सिलिंडरसह पेट्रोल-डिझेल संपल्याची अफवा पसरवण्यात आली. यामुळे येथे पहाटे ५ वाजल्यापासून नागरिकांनी पेट्रोलपंपांवर रांगा लावल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोलपंप बंद करावे लागले, तर काही ठिकाणी वाद झाला. येथे सकाळी शहरातील ६ पेट्रोल पंपांवरच्या इंधनाने तळ गाठला. त्यामुळे ‘पेट्रोल-डिझेल संपले’, असे वृत्त पसरले.

नागपूर शहरातही पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली. परिणामी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला.