
सातारा, २४ मार्च (वार्ता.) – १५ दिवसांपूर्वी सोनगाव ‘कचरा डेपो’ला (कचरा डेपो म्हणजे नगर, शहर येथील कचरा एकत्र करून एका जागी टाकण्याचे ठिकाण) आग लागली होती. जकातवाडी ग्रामस्थांना धुराचा मोठा सामना करावा लागला होता. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. २३ मार्च या दिवशी ग्रामस्थांनी कचरा डेपोतील धुरावर उपाययोजना काढेपर्यंत कचरा डेपोकडे गाड्या न पाठवण्याचा आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. ग्रामस्थांनी केलेल्या या कृतीमुळे सकाळी वाहतूककोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अधिवक्ता दत्ता बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी जकातवाडी ग्रामस्थांनी त्यांची भूमिका ठामपणे मांडत ‘सोनगाव कचरा डेपो’ला विरोध केला. सोनगाव कचरा डेपोवर सीसीटीव्ही छायाचित्रक लावणे, येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, कचरा डेपोतील दूषित पाणी गटारांद्वारे ओढ्यात सोडणे, धुराचा बंदोबस्त होईपर्यंत डेपोमध्ये कचरा टाकण्यात येऊ नये अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या. (अशा मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाकचरा आगाराचे व्यवस्थापन करण्याची मागणी करून ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे स्थानिक स्वराज्य संस्थेला लज्जास्पद ! |
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !