विधानसभा प्रश्नोत्तरे…

मुंबई – नक्षलग्रस्त भागांतील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी १८ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघात तस्करांना पकडणार्या वन विभागाच्या प्रामाणिक अधिकार्यांना एका स्थानिक नेत्याकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते आणि तस्करांना सोडवण्यासाठी दबाव टाकला जातो, असे धक्कादायक वास्तव त्यांनी मांडले.
याला उत्तर देतांना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, ज्या अधिकार्यांनी राजकीय दबावाखाली येऊन तस्करांना सोडून दिले, त्यांची सखोल चौकशी करून त्यांना कठोर शासन केले जाईल. या घटनेतील परिसरातील ‘सीसीटीव्ही’ चित्रण आणि संशयितांचे ‘सीडीआर’ पडताळून (भ्रमणभाषवरून केलेल्या कॉल्सची माहिती) या संपूर्ण जाळ्याचा शोध घेतला जाईल. जर या तस्करीमागे एखादी टोळी किंवा गुंडांच्या फौजा असतील, तर त्यांचा कायमचा बंदोबस्त करून हे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त केले जाईल.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !