हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभ !

हरिद्वार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला मोठी गती मिळाली आहे. त्यामुळे भावी पिढ्याही स्वतःला सनातन संस्कृतीशी जोडून घेऊ लागल्या आहे. त्यांनाही या संस्कृतीचा अभिमान वाटू लागला आहे. स्वामी सत्यमित्रानंदजी यांनी भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. स्वत:च्या आचरणातून त्यांनी संस्कृतीचे पोषण भावी पिढीकडे सुपूर्द केले. भावी पिढीला सनातन संस्कृतीशी जोडण्यात संतांचे योगदान बहुमोल आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतकार्याचा गौरव केला.
Capturing moments from a day dedicated to the preservation of Sanatan culture through the 'Shri Vigraha Murti Sthapana' ceremony at the Samadhi Mandir of Pujya Gurudev Shri Swami Satyamitranand Giri Ji Maharaj, as well as the sacred Darshan of Maa Ganga in Haridwar, Uttarakhand.… pic.twitter.com/UBzCQHSx4i
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 5, 2026
४ फेब्रुवारी या दिवशी उत्तराखंड येथील हरिद्वार येथे श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरिजा महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, जुना आखाड्याचे पीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी, पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल, स्वामी अखिलेश्वरानंदजी, स्वामी हरिचेतनानंदजी, स्वामी ललितानंद गिरीजी, महंत देवानंदसरस्वती आदी मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीच्या जगभरात विखुरलेल्या प्रवाहांना एकत्रित आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी स्वत:चे आयुष्य मानवतेच्या कार्यासाठी वाहिले. आपत्तीच्या ठिकाणी साहाय्य करून त्यातून त्यांनी सनातन संस्कृतीची ओळख निर्माण केली. जगभरातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या; पण भारतीय सनातन संस्कृती आजही टिकून आहे.’’
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !