|

पणजी, २५ जानेवारी (वार्ता.) : गोमंतक ही परशुरामभूमी आहे. या भूमीचा गायीशी थेट संबंध आहे. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते. गोवा राज्यातील एक विशेष गोष्ट मी सांगतो. येथे सनातनची शुद्ध अशी संस्था कार्यरत आहे, ती म्हणजे सनातन संस्था. मी गुरुदेव डॉ. आठवले (सनातन संस्थेचे संस्थापक) यांचे आशीर्वादही प्राप्त केले आहेत. ते पवित्र आत्मा आहेत !
Yogarishi Ramdev Baba praises @SanatanSanstha’s mission! 🔱
During his Goa visit, @yogrishiramdev expressed his deep appreciation for the Sanstha and shared his gratitude for the blessings of the "pure soul" Sachchidananda Parabrahman (Dr) Jayant Athavale#GoaNews… pic.twitter.com/XrgvokRQcp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 25, 2026
आपली वाणी, आहार, विचार, व्यवहार, स्वभाव या सगळ्यांत सनातन धर्म उतरला पाहिजे, यासाठी सनातन संस्था कार्य करत आहे. सनातन धर्माचे शाश्वत सिद्धांत केवळ एका वर्गापुरतेकिंवा एका जातीपुरते मर्यादित नाहीत. ते अखिल विश्वाच्या कल्याणासाठी आहेत. सनातन धर्मयुग प्रतिष्ठापित व्हावे, यासाठी सनातन संस्था फार मोठा पुरुषार्थ करत आहे, असे कौतुकोद्गार योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे काढले.
पणजी येथे ‘इंडिया इंटरनॅशनल आयुर्वेद अँड वेलनेस एक्स्पो अँड समिट २०२६’ या नावाने झालेल्या या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याअंतर्गत योगऋषी रामदेवबाबा यांनी भारतीय प्रशासकीय अधिकारी (आयएएस्), भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी (आयपीएस्), पोलीस कर्मचारी, तसेच सर्व शासकीय अधिकारी यांच्यासाठी पणजीतील योग-सेतू येथे विशेष योगवर्ग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी योगऋषी रामदेवबाबा बोलत होते.
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena