मुंबई-नागपूर ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाच्या पाठीशी राज्य सरकार सर्वशक्तीनिशी उभी राहील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

संभाजीनगर – ‘मुंबई-नागपूर ‘बुलेट ट्रेन’ होणार असेल, तर राज्य सरकार त्याला सर्वशक्तीनिशी पाठिंबा देईल’, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिले. १७ सप्टेंबर या दिवशी ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना’निमित्त सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन स्मृतीस्तंभाजवळ त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. या वेळी ते बोलत होते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याने मोठ्या संयमाने लढा देत मराठवाड्यालाही मुक्ती मिळवून दिली आहे, तसाच लढा कोरोनामुक्तीसाठी द्यायचा आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.