भगवंताचे मानवी जीवनातील महत्त्व !

‘देवाचे दास्यत्व हे मंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान इत्यादी पदांपेक्षाही मोठे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्मविहीन ‍विध्वंसक विज्ञानावर साधना हेच उ‌त्तर !

‘विज्ञानातील शोधांमुळे सर्व देश एकमेकांचा विध्वंस प्रभावीपणे करू शकतात. याउलट साधना शिकल्यामुळे सर्व देशांतील पुढच्या पिढ्यांतील नागरिकांमध्ये एक कुटुंबभावना निर्माण होईल. त्यामुळे तिसर्‍या महायुद्धानंतर पृथ्वीवर सर्वत्र कुटुंबभावनाअसेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्वधर्मसमभाव : एक निरर्थक आणि निराधार संकल्पना !

‘ज्याने ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द शोधला तो आणि हा शब्द मानणारे यांची कीव वाटते; कारण त्यांना ‘धर्म’ म्हणजे काय याची तोंडओळखही नसतांना त्यांनी हा शब्द प्रचलित केला आणि काही पिढ्यांची बुद्धी भ्रष्ट करण्याचे पाप केले !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एकमेवाद्वितीय सनातन प्रभात !

‘सौ सुनार की एक लुहार की ।’, अशी हिंदीत एक म्हण आहे. तिचा अर्थ आहे, ‘सोनाराच्या १०० घावांनी जसे काम होते, तसे लोहाराच्या एका घावाने होते.’ तसेच सनातन प्रभात नियतकालिकांच्या संदर्भात आहे. सनातन प्रभातचे काही सहस्र वाचक जे राष्ट्र-धर्माचे कार्य करत आहेत, तसे लाखो वाचक असलेल्या दैनिकांचे वाचक करू शकत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निवडणुकांचे दुष्परिणाम !

‘निवडणुका राजकारणी आणि जनता यांना स्वार्थ शिकवतात, तर साधना सर्वस्वाचा त्याग शिकवते. यामुळे भारतात पूर्वी निवडणुका नव्हत्या, तर सर्वजण साधना करायचे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एखादा भ्रष्टाचार करत आहे, हे ज्ञात असूनही त्याचा भ्रष्टाचार उघडकीला न आणणारे गुन्हेगार होत !

भ्रष्टाचार्‍याची पत्नी आणि १८ वर्षे वयावरील मुले, नातेवाईक, ओळखीचे, कार्यालयातील सहकारी इत्यादींनाही भ्रष्टाचारी हा पगारापेक्षा अधिक पैसे कमवत असल्याची तक्रार न केल्याविषयी गुन्हेगाराचे साथीदार म्हणून आजन्म कारागृहात टाका ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पाश्चात्त्य आणि भारतीय संगीत अन् नृत्य

‘पाश्चात्त्य देशांत गायन आणि नृत्य केवळ सुखासाठी करतात. याउलट भारतात संगीत आणि नृत्य साधनेचे प्रकार म्हणून ६४ कलांच्या अंतर्गत होते. त्यामुळे संगीत आणि नृत्य साधनेमध्ये ध्यानाप्रमाणे स्थिर न बसताही, म्हणजे गातांना आणि नृत्य करतांना ध्यान लागते ! भक्तीगीते गातांना किंवा समवेत नृत्य करतांना भावही जागृत होतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माचे जागतिक केंद्र असलेल्या भारतासाठी हे लज्जास्पद !

‘चर्च किंवा मशिदी यांचे सरकारीकरण जगात कुठे होत नाही; मात्र अध्यात्म विषयाचे जगाचे केंद्र असलेल्या भारतात शासनकर्ते मंदिरे बळकावतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मशिक्षणाच्या अभावी आत्मघात करून घेणारे हिंदू !

‘धर्मशिक्षणामुळे धर्मासाठी त्याग करण्यास लाखो मुसलमान सिद्ध असतात, तर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते बुद्धीप्रामाण्यवादी होऊन धर्माला खोटे ठरवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेमुळेच आनंदप्राप्ती होते !

‘बहुतांशी अन्य पंथीय पैशांची लालूच दाखवून, कपटाने किंवा बळजोरीने हिंदूंना त्यांच्या पंथात ओढतात; मात्र हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेने आनंदप्राप्ती होत असल्याने तिचे महत्त्व कळल्यावर सुजाण अन्य पंथीय हे हिंदु धर्माचे पालन करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले