सध्याची समाजस्थिती डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच जाणे

सध्याची समाजस्थिती डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच जाणे

आजचा समाज ‘अन्धेनैव नीयमाना यथान्धाः ।’ म्हणजे ‘एका अंधाने नेलेल्या दुसर्‍या अंध माणसाप्रमाणे डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच चालला असून त्यातच ‘आपण धन्य झालो आहोत’, असे समजतो.’

सत्ययुगाचे महत्त्व !

सत्ययुगाचे महत्त्व !

‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वतःतील दोष दूर करण्याचे महत्त्व

स्वतःतील दोष दूर करण्याचे महत्त्व

आपले दोष निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केल्यासच ते नाहीसे होण्याची शक्यता असते; अन्यथा उलटपक्षी ते तसेच राहून जातात. हे चोरांना घरात कोंडून ठेवण्यासारखेच आहे.’

कुठे नोबेल पारितोषिक मिळवणारे, तर कुठे ऋषिमुनी !

‘नोबेल पारितोषिक मिळवणार्‍यांची नावे काही वर्षांतच विसरली जातात; पण धर्मग्रंथ लिहिणारे वाल्मीकिऋषि, महर्षि व्यास, वसिष्ठऋषि इत्यादींची नावे युगानुयुगे चिरंतन रहातात.’

विवेक

विवेक

देहाचे पांघरूण वस्त्र आणि माझे पांघरूण देह. त्यामुळे ‘माझ्या भानासह ‘मी’ देहाहून अगदीच भिन्न असणारा आहे’, असे वाटणे म्हणजेच विवेक.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७४ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे’, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विवेक म्हणजे काय ?

विवेक म्हणजे काय ?

‘जगाकडे नामरूपात्मक दृष्टीने बघणे आणि त्याला कारणीभूत असणारे स्वयं-प्रकाशमान अधिष्ठान विसरणे, म्हणजेच ‘अविवेक’. या वृत्तीमध्ये मोडणारे सर्व कार्यकारण भावज्ञान-विरहित भासणे होय.

कुठे पाश्‍चात्त्य विचारसरणी,तर कुठे हिंदु धर्म !

पाश्‍चात्त्य विचारसरणी आणि संशोधन केवळ सुखप्राप्तीसाठी असते. माणसाची सुखाची हाव कधीच पूर्ण होत नाही; म्हणून अनेक संशोधने करूनही मानव अधिकाधिक दुःखी होत आहे.

सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक

‘सर्वसाधारण व्यक्ती जे काही करते, त्यामागे तिचा उद्देश ‘काहीतरी हवे’, असा असतो. याउलट साधक करत असलेल्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा उद्देश ‘सर्वस्वाचा त्याग करून ईश्‍वरप्राप्ती करायची’, असा असतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले