विज्ञानातील संशोधनाला अध्यात्मशास्त्राने मान्यता दिली पाहिजे !

विज्ञानातील संशोधनाला अध्यात्मशास्त्राने मान्यता दिली पाहिजे !

‘सत्य असते, तेच चिरंतन रहाते. धर्मशास्त्रातील सिद्धांत युगानुयुगे तसेच आहेत. त्यांत कोणी पालट करू शकलेला नाही. याउलट विज्ञानातील सिद्धांत काही वर्षांतच पालटतात; कारण विज्ञान अंतिम सत्य सांगू शकत नाही. तात्पर्य विज्ञानातील संशोधनाला अध्यात्मशास्त्राने मान्यता दिली, तरच ते सत्य समजले पाहिजे, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकीय पक्षांची दु:स्थिती !

राजकीय पक्षांची दु:स्थिती !

‘राजकीय पक्षांतील व्यक्ती राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार न करता केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा विचार करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गलिच्छ राजकारणावर ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय !

गलिच्छ राजकारणावर ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय !

‘हल्लीचे बहुतेक ठिकाणचे राजकारण म्हणजे भ्रष्टाचार आणि गुंडगिरी ! हे सुधारण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापन करण्यास पर्याय नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ʻसर्वधर्मसमभाव’ हा शब्द अडाणीच बोलतात !

ʻसर्वधर्मसमभाव’ हा शब्द अडाणीच बोलतात !

‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द विविध धर्मांचा अभ्यास नसलेले अडाणीच बोलतात. तसे बोलणे म्हणजे ‘सुशिक्षित आणि अशिक्षित सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?

हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?

‘भारतात उपलब्ध असलेली जमीन, धान्य आणि पाणी यांचा विचार करून भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, यांचा विचार करा, नाहीतर पुढे होणार्‍या गर्दीत सर्वजण गुदमरतील ! हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठे ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे ज्योतिषशास्त्र !

कुठे ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे ज्योतिषशास्त्र !

‘कुठे भविष्यात काय होणार, याचे एकाही व्यक्तीच्या संदर्भात सर्व तपासण्या करूनही सांगता न येणारे आणि निसर्गाच्या संदर्भात केवळ ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे केवळ निसर्गाचेच नाही, तर प्रत्येक व्यक्तीचे भविष्य जन्मकुंडली आणि नाडीपट्ट्या अन् संहिता यांच्या आधारे सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी,सर्वधर्मसमभावी,साम्यवादी यांच्यामुळेच देश आणि धर्म यांची स्थिती दयनीय !

बुद्धीप्रामाण्यवादी,सर्वधर्मसमभावी,साम्यवादी यांच्यामुळेच देश आणि धर्म यांची स्थिती दयनीय !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची देवावरची श्रद्धा नष्ट झाली . सर्वधर्मसमभाववाद्यांमुळे हिंदूंना हिंदु धर्माची अद्वितीयता कळली नाही आणि साम्यवाद्यांमुळे हिंदू देवाला मानेनासे झाले. यांमुळे देवाची कृपा न झाल्याने हिंदू आणि भारत यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साम्यवाद हा शब्द पुढे पृथ्वीवरून नाहीसा होण्याचे कारण

साम्यवाद हा शब्द पुढे पृथ्वीवरून नाहीसा होण्याचे कारण

‘साम्यवाद’ या शब्दाला अनुसरून कुठेही ‘साम्य का नसते ?’, यासंदर्भातही साम्यवाद्यांना जिज्ञासा नसते; म्हणून मुळातील कारणे, उदा. प्रारब्ध, वाईट शक्तींचा त्रास, साधना इत्यादी त्यांना कळत नाही. त्यामुळे ही कारणे दूर करण्यास ते साहाय्य कसे करू शकतील ? म्हणूनच लवकरच ‘साम्यवाद’ हा शब्द पृथ्वीवरून नाहीसा होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुन्हेगारी टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे साधना शिकवणे !

गुन्हेगारी टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे साधना शिकवणे !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, हत्या, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी गुन्हे होऊ नयेत म्हणून शाळेत, महाविद्यालयात आणि समाजात स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७५ वर्षांत एका तरी सरकारने शिक्षण दिले का ? न दिल्यामुळे कोट्यवधी गुन्हे झाले आहेत आणि होतही आहेत. यावरचा एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वतंत्र भारतातील आतापर्यंतचे शासनकर्ते यावर विचार करतील का ?

स्वतंत्र भारतातील आतापर्यंतचे शासनकर्ते यावर विचार करतील का ?

‘कुठे भारतात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत केवळ ७५ वर्षेही राज्य करू न शकणारे भारतातीलच आतापर्यंतचे शासनकर्ते, तर कुठे विदेशातून थोड्याशा सैन्यासह भारतात येऊन कोट्यवधी हिंदूंवर शेकडो वर्षे राज्य करणारे मुसलमान, इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले