शिकण्याच्या वृत्तीचा लाभ !
‘प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकता आले, तर चुकीमुळे दुःख न होता, शिकण्याचा आनंद मिळतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकता आले, तर चुकीमुळे दुःख न होता, शिकण्याचा आनंद मिळतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘क्रियमाणकर्माचा पूर्ण वापर करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा; पण फलनिष्पत्ती प्रारब्धावर किंवा देवावर सोडा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कुठे परग्रहावर जाणारे यान शोधले की, विज्ञानाचे कौतुक करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे सूक्ष्म देहाने विश्वातच नाही, तर सप्तलोक आणि सप्तपाताळ यांतही क्षणार्धात सूक्ष्मातून जाऊ शकणारे ऋषि-मुनी !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मायेतील विषय लवकर विसरले जातात. त्यामुळे पहिले आणि दुसरे महायुद्धच नाही, तर नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ यांचीही नावे २५ ते ५० वर्षांत कुणाला ज्ञात नसतात. याउलट अध्यात्मातील इतिहास आणि ग्रंथ युगानुयुगे मानवाला ज्ञात असतात; कारण ते मार्गदर्शन करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्मशास्त्रात १४ विद्या आणि ६४ कला, म्हणजेच जगातील सर्व विषय असतात. आधुनिक विज्ञानाला यासंदर्भात काहीच माहिती नाही. याउलट अध्यात्मशास्त्र यासंदर्भात परिपूर्ण माहिती देते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
आधुनिक विज्ञान निरनिराळ्या ग्रहांचे केवळ पृथ्वीपासूनचे अंतर आणि त्याची भौगोलिक स्थिती एवढेच सांगते. याउलट ज्योतिषशास्त्र ग्रहांचे मानवावर होणारे परिणाम, अनिष्ट परिणाम टाळावयाचे उपाय इत्यादी सर्व सांगते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘संत सांगतात ते सर्व खोटे’, असे म्हणणे, हे एखाद्या बालवाडीतील मुलाने एखाद्या विषयात ‘डॉक्टरेट’ केलेल्याला ‘तू सांगतोस ते सर्व खोटे आहे’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पुन्हा जन्म नको’ किंवा ‘भक्ती करण्यासाठी अनेक जन्म मिळोत’, असे वाटणे या दोन्ही स्वेच्छा झाल्या. यांचा पुढचा टप्पा म्हणजे ‘सर्व काही ईश्वराच्या इच्छेनुसार होवो’, असे वाटणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्मात ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीने अभ्यास करावा लागत नाही. उलट बुद्धीलय झाल्यावर एकाच नाही, तर सर्व विषयांचे ज्ञान तात्काळ प्राप्त होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले