ईश्वराशी एकरूप हाेण्यासाठी काय करायला हवे ?
‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालाही ते नसणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालाही ते नसणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘युद्ध ही तात्कालिक बातमी असते. पुढे ५० – ६० वर्षांतच मोठमोठ्या युद्धांचा इतिहास विसरला जातो, उदा. पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि त्याआधीची सर्व युद्धे. याउलट अध्यात्मविषयक वेद-उपनिषदे इत्यादी ग्रंथ चिरकाल टिकून आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘धर्मासाठी इतर धर्मीय एक होतात, तर संकुचित वृत्तीचे हिंदू केवळ जातीसाठी एक होतात आणि इतर जातीतील स्वधर्मियांशी भांडतात; म्हणून हिंदू प्रतिदिन मार खातात ! या वरचा एकमात्र उपाय म्हणजे हिंदूंना साधना शिकवून त्यांच्यात धर्माभिमान जागृत करणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर कार्य करणारे दुसर्या स्तरावरचे कार्य करू शकत नाहीत; पण आध्यात्मिक स्तरावरच्यांचे कार्य सूक्ष्म स्तरावरील असल्याने त्यांचे कार्य सर्व स्तरांवर होते. त्यांचे वैशिष्ट्य हे की, विशेष काही करावे न लागता त्यांचे सर्व कार्य ईश्वरी कृपेमुळे होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘देव बुद्धीच्या पलीकडे असतांना बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे ही मूर्खपणाची कमाल आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सजिवांतील एकही जीव दुसर्या जिवासारखा नसतांना, उदा. २ झाडे, २ कुत्रे, तसेच पृथ्वीवरील ७५० कोटी मानवांपैकी कोणतेही २ सारखे दिसत नाहीत. एवढेच नाही, तर त्यांची वैशिष्ट्येही निरनिराळी असतात, तरीही ‘साम्यवाद’ शब्द वापरणार्यांची ‘बुद्धी किती क्षुद्र आहे’, हे लक्षात येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘प्रवचनकार आणि कीर्तनकार समाजाला धर्माची थोडीफार माहिती करून देतात. त्यांच्याशिवाय असे करणारे समाजात कुणी नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘श्रीराम स्वतः ईश्वराचा अवतार होता. पांडवांच्या वेळी पूर्णावतार श्रीकृष्ण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी समर्थ रामदासस्वामी होते. यावरून लक्षात येईल की, ईश्वरी राज्याची स्थापना ईश्वर स्वतः करतो किंवा संतांकडून करवून घेतो. ‘आता हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराने करावी किंवा संतांकडून करवून घ्यावी’, यासाठी आपण त्याचे भक्त बनणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भ्रष्टाचार बंद करील, असा एकही राजकीय पक्ष भारतात नाही; म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले