ईश्वराशी एकरूप हाेण्यासाठी काय करायला हवे ?

ईश्वराशी एकरूप हाेण्यासाठी काय करायला हवे ?

‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालाही ते नसणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वेद-उपनिषदे इत्यादी अध्यात्मविषयक ग्रंथांचे महत्त्व

वेद-उपनिषदे इत्यादी अध्यात्मविषयक ग्रंथांचे महत्त्व

‘युद्ध ही तात्कालिक बातमी असते. पुढे ५० – ६० वर्षांतच मोठमोठ्या युद्धांचा इतिहास विसरला जातो, उदा. पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि त्याआधीची सर्व युद्धे. याउलट अध्यात्मविषयक वेद-उपनिषदे इत्यादी ग्रंथ चिरकाल टिकून आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तरुण वयातच साधना करण्याचे महत्त्व !

तरुण वयातच साधना करण्याचे महत्त्व !

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनी प्रतिदिन मार खाण्याचे कारण

हिंदूंनी प्रतिदिन मार खाण्याचे कारण

‘धर्मासाठी इतर धर्मीय एक होतात, तर संकुचित वृ‌त्तीचे हिंदू केवळ जातीसाठी एक होतात आणि इतर जातीतील स्वधर्मियांशी भांडतात; म्हणून हिंदू प्रतिदिन मार खातात ! या वरचा एकमात्र उपाय म्हणजे हिंदूंना साधना शिकवून त्यांच्यात धर्माभिमान जागृत करणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील कार्य

शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील कार्य

‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर कार्य करणारे दुसर्‍या स्तरावरचे कार्य करू शकत नाहीत; पण आध्यात्मिक स्तरावरच्यांचे कार्य सूक्ष्म स्तरावरील असल्याने त्यांचे कार्य सर्व स्तरांवर होते. त्यांचे वैशिष्ट्य हे की, विशेष काही करावे न लागता त्यांचे सर्व कार्य ईश्वरी कृपेमुळे होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे मूर्खपणाची कमाल करणारे धर्मद्रोही !

बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे मूर्खपणाची कमाल करणारे धर्मद्रोही !

‘देव बुद्धीच्या पलीकडे असतांना बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे ही मूर्खपणाची कमाल आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

निरर्थक ‘साम्यवाद’ शब्द !

निरर्थक ‘साम्यवाद’ शब्द !

‘सजिवांतील एकही जीव दुसर्‍या जिवासारखा नसतांना, उदा. २ झाडे, २ कुत्रे, तसेच पृथ्वीवरील ७५० कोटी मानवांपैकी कोणतेही २ सारखे दिसत नाहीत. एवढेच नाही, तर त्यांची वैशिष्ट्येही निरनिराळी असतात, तरीही ‘साम्यवाद’ शब्द वापरणार्‍यांची ‘बुद्धी किती क्षुद्र आहे’, हे लक्षात येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रवचनकार आणि कीर्तनकार यांचे महत्त्व !

प्रवचनकार आणि कीर्तनकार यांचे महत्त्व !

‘प्रवचनकार आणि कीर्तनकार समाजाला धर्माची थोडीफार माहिती करून देतात. त्यांच्याशिवाय असे करणारे समाजात कुणी नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी आपण भक्त बनणे आवश्यक !

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी आपण भक्त बनणे आवश्यक !

‘श्रीराम स्वतः ईश्वराचा अवतार होता. पांडवांच्या वेळी पूर्णावतार श्रीकृष्ण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी समर्थ रामदासस्वामी होते. यावरून लक्षात येईल की, ईश्वरी राज्याची स्थापना ईश्वर स्वतः करतो किंवा संतांकडून करवून घेतो. ‘आता हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराने करावी किंवा संतांकडून करवून घ्यावी’, यासाठी आपण त्याचे भक्त बनणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची अत्यावश्यकता !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची अत्यावश्यकता !

‘भ्रष्टाचार बंद करील, असा एकही राजकीय पक्ष भारतात नाही; म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले