परिपूर्ण अध्यात्मशास्त्र आणि बाल्यावस्थेतील विज्ञान !

परिपूर्ण अध्यात्मशास्त्र आणि बाल्यावस्थेतील विज्ञान !

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि-मुनींनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतात कुणी काही पालट करू शकत नाही; कारण त्यांनी चिरंतन सत्य सांगितले आहे. त्यामुळे त्यात ‘संशोधन’ असे काही नसते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विज्ञानात ‘संशोधन’ सतत करावे लागते; कारण त्यांचे सिद्धांत काही काही वर्षांनी पालटत असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतियांच्या ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अद्वितीयत्व !

भारतियांच्या ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अद्वितीयत्व !

‘सहस्रो वर्षांपासून भारतातील हिंदूंनी ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल केली, इतर देशांप्रमाणे पृथ्वीवर आपले साम्राज्य स्थापण्यासाठी प्रयत्न केले नाहीत; कारण त्यांना त्यातली निरर्थकता ज्ञात होती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम !

मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७५ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाची मर्यादा !

विज्ञानाची मर्यादा !

‘अध्यात्मशास्त्रामुळे विज्ञान कळते; पण विज्ञानामुळे अध्यात्म कळत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुन्हेगारी‍वर आळा घालण्यासाठी साधना अपरिहार्य !

गुन्हेगारी‍वर आळा घालण्यासाठी साधना अपरिहार्य !

‘भारतात पोलीसदलासह सर्वच क्षेत्रांत गुन्हेगार असणे, हे स्वातंत्र्यापासूनच्या सर्वच शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे ! मुलांना शाळेपासून साधना शिकवली असती, तर ती मोठी झाल्यावर कुणी गुन्हेगार झाला नसता.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्‍यांचा फोलपणा !

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्‍यांचा फोलपणा !

‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गेल्या १ सहस्र वर्षांपासून हिंदूंची स्थिती दयनीयच !

गेल्या १ सहस्र वर्षांपासून हिंदूंची स्थिती दयनीयच !

‘प्रथम मुसलमान, नंतर इंग्रज यांनी हिंदूंची दयनीय स्थिती केली आणि आता बहुतांश राजकीय पक्ष हिंदूंची स्थिती दयनीय करत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यज्ञाला विरोध करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

यज्ञाला विरोध करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘बुद्धीप्रामाण्यवादी यज्ञात आहुती देण्यात येणार्‍या वस्तूंच्या संदर्भात म्हणतात, ‘त्या वस्तू यज्ञात जाळता कशाला ?’ असे म्हणणे हे ‘इंजेक्शन देऊन एखाद्याला वेदना का देता ?’, असे म्हणण्यासारखे आहे. इंजेक्शनमुळे जसे लाभ होतात, तसेच यज्ञात आहुती दिल्यामुळे होतात, हे त्यांना अभ्यासाच्या अभावी कळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !

यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !

‘भक्तांकडेच मंदिरे हवीत, तरच देवाची सेवा भावपूर्ण होईल. सरकारीकरणामुळे मंदिरातील देवाची सेवा भावपूर्ण होत नाही, तसेच सरकारमध्ये असलेला भ्रष्टाचार देवळातही होतो. त्यामुळे देव मंदिरातून जाईल आणि भक्तांना देवळात जाण्याचा लाभ होणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताची आणि हिंदु धर्माची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी

भारताची आणि हिंदु धर्माची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी

‘शिक्षणासाठी जगभरातून भारतात येतात, असा एकच विषय आहे आणि तो म्हणजे मानवाचे चिरंतन कल्याण करणारे अध्यात्मशास्त्र आणि साधना. ती हिंदु धर्माची जगाला देणगी आहे. असे असूनही भारतातील आतापर्यंतच्या एकाही राजकारण्याला त्याचे महत्त्व कळले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःची, भारताची आणि हिंदु धर्माची पराकोटीची हानी केली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले