मादळमोही (जिल्हा जालना) येथे २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापार्यास हात-पाय बांधून कालव्यात फेकले !
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील व्यावसायिक कैलास शिंगटे यांचे २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ५ ते ६ जणांनी साठेवाडी फाटा येथून अपहरण केले. त्यानंतर तोंडात बोळा कोंबून आणि हातपाय बांधून त्यांना मारहाण करत वडीगोद्रीजवळ पाटात फेकून दिले.