‘मुंबई’ असे लिहिण्याची चेतावणी !

ठाणे – मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी येथील प्रसिद्ध ‘बॉम्बे ढाब्या’चा फलक मनसेने फाडला. ८ जानेवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे जिल्हा दौर्यावर असतांना त्यांची दृष्टी ‘बॉम्बे ढाबा’ असे लिहिलेल्या फलकावर पडताच कार्यकर्त्यांनी तात्काळ फलक फाडला. या वेळी ढाब्याच्या मालकाला ‘बाँबे’ऐवजी ‘मुंबई’ नाव लावण्याची चेतावणी देण्यात आली. ‘नाव पालटले नाही, तर ढाब्यावर कारवाई करू’, अशी चेतावणी मनसैनिकांनी दिली आहे. अंतिमतः ढाब्याच्या मालकाने फलक पालटण्याचे आश्वासन दिले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक