उत्तरप्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री गोविंद पंत असतील, तर मुंबईचा महापौर उत्तर भारतीय का नाही ?

उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचे मनसेला प्रत्युत्तर !

मुंबई – उत्तर भारतीय सेनेने शिवसेना भवनासमोर लावलेल्या फलकावर ‘उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे, वरना बाटोगे तो पिटोगे ।’ असे लिहिण्यात आले आहे. या फलकाद्वारे सेनेने मनसेला प्रत्युत्तर दिले आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला म्हणाले, ‘‘जर उत्तरप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद पंत हे मराठी असू शकतात, तर मुंबईचा महापौर उत्तर भारतीय का असू शकत नाहीत ?’’

मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले होते, ‘‘मराठीचा अपमान कराल, तो नहीं बटोगे तो भी पिटोगे ।’ (मराठीचा अवमान केल्यास विभाजित झाला नाहीत, तरी मार खाल !)