वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले यांची कुंभमेळ्यावर टीका !

नाशिक – कुंभमेळ्यासाठी १४ सहस्र कोटी रुपये आहेत; पण मुलांच्या शिक्षणासाठी २ सहस्र कोटी रुपये नाहीत. साधूग्राम वसवण्यासाठी झाडे कापणार आहेत, अशी उपरोधिक टीका वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केली आहे. (साधूग्रामची जागा ही अनेक वर्षांपासूनची आहे आणि त्या पडीक परिसरावर आता देशी अन् विदेशी वृक्ष आहेत. काही विदेशी वृक्षांमुळे भूमीची धूपही थांबत नाही, त्यावर पक्षी घरटीही करत नाहीत; उलट ते अधिक पाणी वापरतात. असे विदेशी वृक्ष काढणार, असे प्रशासनाने सांगितले आहे. प्रत्येक कुंभमेळ्याला हे केले जाते ! – संपादक)
टकले यांनी एका व्हिडिओत असेही म्हटले, ‘‘नाशिकमध्ये कुंभमेळ्यात ५-१० टन गांजा येतो. सर्व गांजा पिणारे येतात. त्या वेळी १० दिवस घराच्या बाहेर पडू शकत नाही, अशी स्थिती असते. येथील स्थानिक दुकानदार, उपाहारगृहांचे मालक यांना दुकाने बंद ठेवावी लागतात. पूर्ण शहर घाण होते. ६ कोटी लोक शहरात येणार, हे नाशिक शहर पेलवू शकत नाही. नाशिकमध्ये तेवढी सुलभ शौचालयेही नाहीत.’’ (उत्तरप्रदेशामध्ये फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या महाकुंभमध्ये चांगल्या पद्धतीने स्वच्छता राखली गेली होती. त्याच धर्तीवर येथे नियोजन झाले, तर येथेही स्वच्छता राखली जाईल ! – संपादक)
संपादकीय भूमिका :
|
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !