
पणजी, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – संभाजीनगर (वास्को) येथील श्रीविद्या प्रतिष्ठान या संस्थेकडून आणीबाणीच्या काळात अन्याय, दडपशाही आणि स्वातंत्र्य यांच्यावर झालेल्या आक्रमणाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहिलेल्या सत्याग्रहींच्या सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २० नोव्हेंबर २०२५ या दिवशी दुपारी ४ वाजता पणजी येथील क्राउन(झांट्ये) सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकमधील श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक उपस्थित रहाणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते जयंत मोहन मिरिंगकर असतील.
भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील आणीबाणी या काळ्याकुट्ट पर्वात आणीबाणीच्या विरोधात ठामपणे उभे राहिलेल्या सत्याग्रहींचा अद्वितीय त्याग, संघर्ष आणि धैर्य याला ५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गोव्यातील सत्याग्रहींचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी एक विशेष पुस्तिका प्रकाशित केली जाणार असून या पुस्तिकेद्वारे आणीबाणीच्या काळातील घटना, आठवणी आणि प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्याचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !