दिवाळीच्या पूर्वसंध्येला होंडा, सत्तरी येथील पोलीस चौकीच्या समोर वाहनाला आग लावल्याचे प्रकरण

पणजी, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यात स्वयंघोषित कार्यकर्ते सिद्ध झालेले आहेत. हे कार्यकर्ते इतरांचे चारित्र्यहनन करून खंडणी गोळा करत आहेत. सरकार असे करणार्यांवर कारवाई करणार आहेच; पण त्याचबरोबर प्रसारमाध्यमांनीही अशी गैरकृत्ये समाजासमोर आणली पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
‘राज्यात आज अशासकीय संस्था (‘एन्.जी.ओ.’ – नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स) किंवा स्वयंघोषित कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत आणि अशा संस्था किंवा व्यक्ती कुणाबद्दलही काहीही प्रतिक्रिया व्यक्त करतात. अशा स्वयंघोषित कार्यकर्त्यांवर कारवाई करणार का ?’, या पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते. पत्रकारांनी विचारलेला प्रश्न किंवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेले उत्तर हे होंडा, सत्तरी येथील घटनेशी थेट संबंधित नाही, तरीही पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी होंडा, सत्तरी येथे तक्रारदारावर खंडणी गोळा करण्याचा गंभीर आरोप २२ ऑक्टोबर या दिवशी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या विधानाकडे पाहिले जात आहे.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !