दिवाळीच्या पूर्वसंध्येला होंडा, सत्तरी येथील पोलीस चौकीच्या समोर वाहनाला आग लावल्याचे प्रकरण

पणजी, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यात स्वयंघोषित कार्यकर्ते सिद्ध झालेले आहेत. हे कार्यकर्ते इतरांचे चारित्र्यहनन करून खंडणी गोळा करत आहेत. सरकार असे करणार्यांवर कारवाई करणार आहेच; पण त्याचबरोबर प्रसारमाध्यमांनीही अशी गैरकृत्ये समाजासमोर आणली पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
‘राज्यात आज अशासकीय संस्था (‘एन्.जी.ओ.’ – नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स) किंवा स्वयंघोषित कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत आणि अशा संस्था किंवा व्यक्ती कुणाबद्दलही काहीही प्रतिक्रिया व्यक्त करतात. अशा स्वयंघोषित कार्यकर्त्यांवर कारवाई करणार का ?’, या पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते. पत्रकारांनी विचारलेला प्रश्न किंवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेले उत्तर हे होंडा, सत्तरी येथील घटनेशी थेट संबंधित नाही, तरीही पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी होंडा, सत्तरी येथे तक्रारदारावर खंडणी गोळा करण्याचा गंभीर आरोप २२ ऑक्टोबर या दिवशी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या विधानाकडे पाहिले जात आहे.
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद