
हिंदु राष्ट्राचा सूर्य उगवण्यासाठी प्रभा अगोदर येते तसा हा आरंभ आहे ! – विद्याधर नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान

शेवटी सत्य हे उघडकीस येणारच आहे आणि त्याचा हा आरंभ आहे. हिंदु राष्ट्राचा सूर्य उगवण्यासाठी प्रभा अगोदर येते, तसा हा आरंभ आहे. याचा आपण सर्वांनी आनंद घेऊया आणि गुरुदेवांनी सांगितले त्याप्रमाणे आपण सर्वजण कार्यरत राहूया.
सत्याचा नेहमी विजय होतो ! – स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, महामंत्री, अखिल भारतीय संत समिति, महाराष्ट्र प्रदेश

आपल्या तीनही हिंदुत्वनिष्ठांना जामीन मिळाला या गोष्टीचा आनंद आहेच; परंतु त्यासोबतच दुःख याही गोष्टीचे आहे की, डॉ. तावडे यांच्यासारख्यांचा ९ वर्षांचा कालावधी वाया गेला. याची भरपाई आता कोण करेल ? आपल्या हिंदुस्तानमध्ये ही एक यंत्रणा अशी काम करत आहे की, जी सनातन हिंदु धर्माला, साधूसंतांना, हिंदुत्वनिष्ट कार्यकर्त्यांना विरोध आणि दडपण्याचे काम करत आहे. त्यांच्या या धर्मविरोधी अपप्रचाराला हिंदुत्वनिष्ठांना नाहक फसावे लागले आणि त्यांच्या जीवनातील अमूल्य अशी वर्षे वाया जातात; पण सत्याचा नेहमी विजय होतो.
सनातन संस्थेशी जोडलेले लोक कधीच अयोग्य विचार आणि कृती करू शकत नाहीत ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

डॉ. तावडे यांसह तिघांचे जामीन झाले, ही बातमी ऐकल्यानंतर मलाच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातील वारकर्यांना अतिशय आनंद झालेला आहे. त्याचे कारण असे की, डॉ. तावडेंसमवेत माझा आणि वारकरी संप्रदायातील अनेकांचा पुष्कळ चांगला संपर्क आणि संबंध आलेला होता. ते अतिशय प्रामाणिक, नि:स्वार्थ आणि हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीमत्त्व आहेत, तसेच राष्ट्राच्या हितासाठी सदैव विचार करणारे आहेत. त्यांच्यावर सनातन संस्थेचे संस्कार असून, ही संस्था संपूर्ण देश आणि हिंदु धर्म यांचा विचार करणारी संस्था आहे, त्यामुळे या संस्थेशी जोडलेले लोक कधीच अयोग्य विचार आणि कृती करू शकत नाहीत. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले आणि त्यामुळेच आज डॉ. तावडेंना जामीन मिळालेला आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !