
पणजी, २२ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात वर्ष २०२६ पर्यंत एकही खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक किंवा संबंधित व्यावसायिक बेरोजगार रहाणार नाही. आतापर्यंत १२ खाणपट्ट्यांचा लिलाव झाला आहे आणि यांपैकी ९ खाणींचे काम त्वरित चालू होणार आहे, तर उर्वरित ३ खाणींचे काम पुढील वर्षी मार्च मासात चालू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यात पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने खाणकाम पुन्हा चालू करण्यात यश मिळेल आणि ते ‘खाण अन् खनिजे (विकास आणि नियमन) कायदा’, तसेच सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे यांनुसारच होणार आहे.’’
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !