
(हे छायाचित्र कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी नाही, तर प्रशासनकडून केली जाणारी दिशाभूल कळण्यासाठी प्रसारित केले आहे )
कोल्हापूर, १७ सप्टेंबर – महापालिका प्रशासन आणि जिल्ह्यात ग्रामीण पातळीवरील स्थानिक प्रशासन प्रदूषणाचे कारण पुढे करून अनेक ठिकाणी श्री गणेशमूर्ती दान म्हणून घेतात; मात्र अनेक ठिकाणी या मूर्ती पुढे विसर्जित केल्या जात नाहीत. अशाच प्रकारे शहरातील कळंबा तलाव येथे दान घेतलेल्या मात्र विसर्जित न केलेल्या मूर्ती हिंदुत्वनिष्ठांनी पुढाकार घेऊन परत विसर्जित केल्या. यात ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे, तसेच यादव महाराज यांचा समावेश होता.
या संदर्भात श्री. संभाजीराव भोकरे म्हणाले, ‘‘हिंदूंच्या धार्मिक परंपरांना छेद देत अकारण जलप्रदूषणाचा बाऊ करत अनेक ठिकाणी गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशमूर्ती दान म्हणून घेतल्या जातात; मात्र अनेक ठिकाणी गणेशोत्सव संपल्यावर १०-१२ दिवसांनंतरही या मूर्ती उघड्यावर असलेल्या आढळून येतात. हा प्रकार भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन रंकाळा तलाव परिसरातील, तसेच कागल तालुक्यातील दूधगंगा नदीच्या परिसरातील बाहेर आलेल्या श्री गशेणमूर्ती परत नदीत विसर्जित केल्या. तरी या पुढील काळात तरी यातून प्रशासनाने धडा घेऊन हिंदु धर्म-परंपरा यांच्या विरोधात असलेल्या मूर्तीदानासारख्या कृती राबवू नयेत.’’
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
रेल्वेमार्गाने येणार्या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! – सकल हिंदु समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा यांविषयी ‘गोकुळ’ संघाकडून कधीही तडजोड करण्यात आलेली नाही !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील धार्मिक स्थळांच्या परिसरात असलेली मांसाहाराची दुकाने बंद करा ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन