
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लावूनही ऑगस्ट महिन्यात भारतातील निर्यात वाढली आहे. सरकारकडून ही आकडेवारी घोषित करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात भारताची व्यापारातील तूट (आयात-निर्यातीतील भेद) अल्प होऊन ती २ लाख ३३ सहस्र कोटी रुपये झाली. जुलै महिन्यात ती २ लाख ४१ सहस्र कोटी रुपये होती. ‘ऑगस्ट महिन्यात २ लाख १८ सहस्र कोटी रुपयांची भारताला व्यापारी तूट होईल’, असा अंदाज अर्थतज्ञांनी वर्तवला होता. ऑगस्ट महिन्यात भारतात आयात करत असल्याचे प्रमाण १०.१ टक्क्यांनी अल्प झाले म्हणजेच ते प्रमाण ५ लाख ४२ सहस्र कोटी रुपयांपर्यंत खाली आले, तर निर्यात ६.७ टक्के वाढून ते ३ लाख ९ सहस्र कोटी रुपयांपर्यंत झाले.
अमेरिकेने लावलेल्या शुल्कानंतर भारतावर फार काही परिणाम झाला नाही, असे सांगितले जात आहे. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारतातून अमेरिकेत ३ लाख ५६ सहस्र कोटी रुपये अरब डॉलरची निर्यात झाली. भारत हा अमेरिकेचा सर्वांत मोठा निर्यातदार आहे; मात्र आता ५० टक्के आयात शुल्कामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. याचा फटका भारतापेक्षा अमेरिकेला अधिक बसतांना दिसत आहे.
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump