Mumbai HC On Local Trains : लोकलगाड्यांमधून पडून प्रवासी मरणे, ही परिस्थिती चिंताजनक ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – मुंबईतील लोकलगाड्यांमधून पडून प्रवासी मृत्युमुखी पडण्यापासून रोखण्यासाठी स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने करायला हवा. मुंब्रा येथे लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुःखद आहे. रेल्वेने केलेले कोणतेही उपाय पुरेसे नाहीत. लोकलगाड्यांमधून पडून प्रवासी मरत आहेत.

आकडेवारीवरून असे दिसून येते की, रेल्वे अपघातात प्रतिदिन अनुमाने १० प्रवासी मरतात. ही परिस्थिती चिंताजनक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपिठाने गर्दीमुळे, तसेच चालत्या गाड्यांमधून पडून होणार्‍या रेल्वे प्रवाशांच्या वारंवार होणार्‍या मृत्यूंशी संबंधित जनहित याचिकेवर सुनावणी केली.

चिंता व्यक्त करतांना मुख्य न्यायाधीश आराधे म्हणाले, ‘‘आमची केवळ अशीच इच्छा आहे की, भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नयेत.’’