Corona Deaths : गेल्या १० दिवसांत देशात कोरोनामुळे ५८ जणांचा मृत्यू

केंद्र सरकारचे राज्यांना ऑक्सिजन आणि बेड यांची व्यवस्था करण्याचे निर्देश

(प्रतिकात्मक चित्र)

नवी देहली : देशभरात कोरोनामुळे जानेवारी २०२५ पासून ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांपैकी ५८ मृत्यू गेल्या १० दिवसांत झाले आहेत. एका आठवड्यापासून प्रतिदिन सरासरी ५-६ लोकांचा मृत्यू होत आहे, तर प्रतिदिन सुमारे ४०० नवीन रुग्णांची नोंद होत आहे.

१. देशात सध्या कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ६ सहस्र १३३ वर पोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक १ सहस्र ९५० रुग्ण आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये ८२२, बंगालमध्ये ६९३ आणि देहलीमध्ये ६८६ सक्रीय रुग्ण आहेत.

२. केंद्र सरकारने सर्व राज्यांना ऑक्सिजन, आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधांची पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.