रायपूर (छत्तीसगड) येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या आंदोलनात करण्यात आली मागणी !

रायपूर (छत्तीसगड) – उरी, पठाणकोट आणि पुलवामा यांसारख्या आतंकवादी आक्रमणांना कठोर उत्तर दिल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे थांबलेली नाहीत, हे नुकत्याच पहलगाममध्ये झालेल्या आक्रमणानंतर स्पष्ट झालेले आहे. या घटनेत आतंकवाद्यांनी धर्म विचारून २८ भारतियांची निर्घृण हत्या केली. जिहाद्यांनी केलेले आक्रमण हे भारताचे सार्वभौमत्व आणि हिंदु समाज यांवरील थेट आक्रमण आहे. त्यामुळे आता भारत सरकारने इस्रायलचा आदर्श घेऊन पाकवर सैनिकी कारवाई करून कठोर धडा शिकवावा, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात करण्यात आली.
या आंदोलनात शिवसेना रायपूर, हिंदु महासभा, लक्ष सनातन संगम, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभाग घेतला. या आंदोलनामध्ये शिवसेना रायपूरचेश्री. आशिष परेडा, ‘लक्ष सनातन संगम’चे श्री. विशाल ताम्रकार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीरज क्षीरसागर यांनी संबोधित केले. या आंदोलनातील मागण्यांचे निवेदन रायपूर येथील जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. ते तहसीलदार प्रवीण परमार यांनी स्वीकारले. यावेळी त्यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.