मुंबई – मुंबईहून उड्डाण करणार्या ३ विमानांमध्ये बाँबची धमकी देण्यात आली. एअर इंडियाचे पहिले विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जात होते. बाँबच्या धमकीची माहिती मिळताच विमान देहलीकडे वळवण्यात आले. हे विमान सध्या देहलीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. विमानात २३९ प्रवासी होते. दुसरे विमान मुंबईहून मस्कतला जात होते. तिसरे विमान मुंबईहून जेद्दाहला जात होते. या दोन्ही विमानांना विलगीकरणात ठेवून त्यांची पडताळणी केली जात आहे. सध्या सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाआता विमान प्रवासही असुरक्षित ! अशी धमकी देणार्यांना कारागृहात डांबायला हवे ! |