मराठा समाजाने कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी करणे आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई – मराठा समाजाच्या मागण्या न्याय्य असल्या, तरी त्या कायद्याच्या चौकटीत बसल्या पाहिजेत. मागील वेळी आपण सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवून ठेवू शकलो होतो. त्यामुळे मराठा समाजाने कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी येथे केले. ते कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने आयोजित केलेल्या तुर्भे येथील माथाडी कामगार मेळाव्यात बोलत होते.