‘नागपूर ते सिकंदराबाद’ आणि ‘पुणे ते हुबळी’ ‘वंदे भारत’ गाडी धावणार !

पुणे – नागपूर आणि पुणे या मार्गांवर ‘वंदे भारत’ गाड्या चालवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ही मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ‘नागपूर ते सिकंदराबाद’ आणि ‘पुणे ते हुबळी’ दरम्यान धावणार आहे.

वंदे भारतचा पुणे ते सांगली हा प्रवास फक्त ३ घंटे ५५ मिनिटांचा असेल. पंतप्रधान मोदी या ट्रेनचे लोकार्पण करणार आहेत. १५ सप्टेंबर या दिवशी पंतप्रधान मोदी १० वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन करणार आहेत. त्यात या गाडीचा समावेश आहे. या दोन गाड्यांनंतर महाराष्ट्रात एकूण ८ वंदे भारत ट्रेन धावतील.