काँग्रेसचा हिंदुद्वेष !

प्रतीकात्मक चित्र

काँग्रेसने बिहार राज्यातील जगप्रसिद्ध नालंदा विद्यापिठाच्या रेल्वेस्थानकाला विद्यापिठाचा विध्वंस करणार्‍या शत्रूचेच ‘बख्तियारपूर’ असे नाव दिले. वर्ष १९५३ पूर्वीच्या एका चित्रपटामध्ये नालंदा रेल्वेस्थानकाचा फलक दिसतो. हा उघड उघड हिंदूंचा तिरस्कार आणि मुसलमानांचा पुरस्कार आहे. काँग्रेसला हिंदूंचा एवढा द्वेष का ? भारतावर आक्रमण करणारे परकीय मुसलमान तिला जवळचे का वाटतात ? मुसलमानांचे लांगूनचालन केल्याने त्यांची एकगठ्ठा मते मिळवून निवडून येणे, हिंदूंना प्रत्येक क्षेत्रात डावलणे, हेच काँग्रेसचे ध्येय होते. मुसलमानांनी प्रतिदिन शेकडो ठिकाणी केलेल्या हिंसा काँग्रेसला दिसत नाहीत, उलट संसदेमध्ये ‘हिंदू हिंसक आहेत’, अशी गरळओक काँग्रेसचे खासदार राहुल गांधी करत आहेत.

हिंदूंमधील संघटितपणा तोडण्यासाठी, हिंदूंच्या सोयी-सवलती काढून घेण्यासाठी, त्यांच्यात जातीवरून फूट पाडण्यासाठी अन् भांडणे लावण्यासाठी काँग्रेसने वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केले. ‘हिंदूंमध्ये फूट पाडून त्यांची संघटित शक्ती नष्ट करा आणि त्यांच्या मतांमध्ये विभागणी करून निवडून येऊन राज्य करा’, अशी कूटनीती काँग्रेसने अवलंबली आणि कृतीतही आणली. शीख, जैन, लिंगायत, बौद्ध यांना हिंदूंपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला.

हिंदुस्थानची १९४७ या वर्षी फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तान हे मुसलमान राष्ट्र म्हणून घोषित झाले; परंतु भारताला हिंदु राष्ट्र घोषित न करण्याचे ठरवून ते कृतीत आणले. मुसलमानांना स्वतंत्र भारतात रहाण्याची अनुमती दिली. त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या. त्यांच्यावर सोयी-सवलतीची खैरात केली. निवडून येण्यासाठी त्यांची एकगठ्ठा मते बांधून ठेवली. वर्ष १९७५ मध्ये आणीबाणी लादली. सरकारमध्ये मुसलमानांना महत्त्वाची मंत्रीपदे दिली. अगदी उपराष्ट्रपती पदापर्यंतची महत्त्वाची पदेही त्यांना बहाल केली. प्रत्येक क्षेत्रात हिंदूंच्या तोंडची भाकरी काढून मुसलमानांना दिली. सलग ५ वेळा मुसलमान शिक्षणमंत्री ठेवून भारताचा खोटा इतिहास लिहून प्रसृत केला. सहस्रो मदरसे चालू करून त्यांना मोठ्या रकमेचे अनुदान दिले. अल्पसंख्यांकांना शेकडो अनुदाने, सवलत योजना चालू करून मुसलमानांच्या तुंबड्या भरल्या. दंगली, गोहत्या यांसारख्या घटनेत काँग्रेसने धर्मांधांवर गुन्हे नोंद न करण्याचे अघोषित आदेश दिले. केवढा हा पराकोटीचा हिंदुद्वेष ! हिंदूंची लोकसंख्या वाढू नये म्हणून लोकसंख्या नियंत्रणाचे डोस हिंदूंना पाजले; मात्र मुसलमानांना त्यामध्ये सवलत देऊन त्यांच्या लोकसंख्या वाढीला हातभारच लावला. त्यामुळे भारतात मुसलमानांची लोकसंख्या अनियंत्रित अशी वाढत चालली असून एक दिवस भारत बहुसंख्य मुसलमान राष्ट्र होईल, अशी स्थिती निर्माण करून ठेवली. काँग्रेसचे हे हिंदुद्वेषाचे पाप ती कुठे फेडणार आहे ?

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.