
हरिद्वार (उत्तराखंड) – कावड यात्रा २६ जुलैला हरिद्वार शहराच्या ज्वालापूर भागातून जाणार होती; मात्र त्यापूर्वीच या मार्गावरील २ मशीद आणि १ मजार (मुसलमानाचे थडगे) यांच्या समोर पडदे लावून ते झाकण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाला ही माहिती मिळताच प्रशासनाने ‘आम्ही अशा प्रकारे पडदे लावण्याचे कोणतेही निर्देश दिले नव्हते’, असे सांगत ते सर्व पडदे काढले.
१. यासंदर्भात हरिद्वारचे पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार म्हणाले की, या यात्रा मार्गांवर बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यात येत होते, त्या वेळी चुकून पडदे लावण्यात आले असावे. यामागे कुठलाही चुकीचा हेतू नव्हता.
२. या संदर्भात पालकमंत्री सतपाल महाराज म्हणाले की, कावड यात्रेच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच यात्रा सुखरुप पार पडावी, यासाठी मशीद आणि मजार यांच्यासमोर पडदे लावण्यात आले होते. यामागे दंगल भडकवण्याचा उद्देश नव्हता.
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !