कोल्हापूर येथे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली !

कोल्हापूर – येथे पंचगंगा नदीने ४३ फूट म्हणजे धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूर येणार्‍या भागातील नागरिकांचे स्थलांतर प्रशासनाने चालू केले आहे. राधानगरी धरणाची स्वयंचलित द्वारे उघडण्यात आली आहेत. आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी-रजपूतवाडी दरम्यान पाणी आल्याने पोलिसांनी शिवाजी पुलावरील वाहतूक बंद केली आहे.