हिंदु शांत आहेत; म्हणून हिंदुविरोधी वक्तव्ये केली जात आहेत ! – नितेश राणे, आमदार, भाजप

भाजपचे आमदार नितेश राणे

मुंबई – देशाच्या संसदेत राहुल गांधी यांनी हिंदु समाजावर टीका केली. या देशात ९० टक्के हिंदु रहातात. आपला देश हिंदु राष्ट्र आहे. हिंदू शांत आहेत; म्हणून तुम्ही काही लोकांना खुश करण्यासाठी हिंदुविरोधी वक्तव्ये करत आहात. हिंदू शांत आहेत; म्हणून तुमचे हे सर्व प्रकार चालले आहेत; मात्र जेव्हा हिंदू अशांत आणि हिंसक होतील, तेव्हा राहुल गांधींना ते महागात पडेल, अशी चेतावणी भाजपचे प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिली. विधानभवनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलतांना आमदार राणे यांनी वरील चेतावणी दिली. या वेळी आमदार राणे पुढे म्हणाले, ‘‘जे विरोधी पक्षनेते, आमदार यांना राहुल गांधी यांचे वक्तव्य चुकीचे वाटत नाही, त्यांनी ते स्वतः हिंदु आहेत, हे विसरू नये. नाहीतर ज्यांना खुश करण्यासाठी हिंदूंवर टीका करता, ते १ टक्कासुद्धा देशात रहाणार नाहीत.’’

संपादकीय भूमिका :

बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात हिंदुविरोधी वक्तव्ये करण्याचे धाडस कुणी करणार नाही, असा वचक हिंदू कधी निर्माण करणार ?