
इचलकरंजी (कोल्हापूर) – हिंदूंसाठी गाय ही महत्त्वाची असतांना महाराष्ट्रात नव्हे, तर देशात निष्पाप गाय, बैल, वासरे यांची तस्करी होते आणि पुढे जाऊन धर्मांधांकडून गायींची सामूहिक कत्तल होते. काही सणांचे औचित्य साधून मोठ्या शहरातच नव्हे, तर लहान गावातही गायी-वासरांच्या प्रचंड कत्तली होतात. कायद्याने गोहत्या बंदी असतांना आजही कोल्हापूर सांगली, मिरज, वडगाव, इचलकरंजी, निपाणी (कर्नाटक) अशा ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक चालू असते आणि गोरक्षकांवर आक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे येणार्या काळात गोहत्या आणि अवैध वाहतुकीविषयी प्रशासनाने दक्ष रहावे, असे निवेदन बजरंग दलाच्या वतीने विभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवी यांना दिले.
या प्रसंगी निवेदन देतांना सर्वश्री शिवजी व्यास, रविकिरण हुक्कीरेकर, अमोल शिरगुप्पे, अमित पाटील, सर्जेराव कुंभार, दत्तात्रय डांगरे, उमेश संगावकर, राजेश बुग्याड यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादकीय भूमिकागोवंशहत्या बंदीचा कायदा असूनही पोलीस प्रशासन राज्यातील गोहत्या, गोतस्करी आदी बंद करण्यात अयशस्वी ठरले आहेत. आणखी किती निवेदने दिल्यानंतर पोलीस कारवाई करणार आहेत ? |
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन