हिंदु व्यासपिठाच्या वतीने आयोजित कोल्हापूर येथील ‘डॉ. के.ब. हेडगेवार व्याख्यानमाला !’

कोल्हापूर – ‘स्वातंत्र्य लक्ष्मी’ ही पहिली उद्घोषणा करून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःला झोकून दिले. त्यात त्यांनी स्वतःचे आयुष्य वेचले, असे प्रतिपादन अभिनेते योगेश सोमण यांनी केले. येथील हिंदु व्यासपिठाच्या वतीने आयोजित ‘डॉ. के.ब. हेडगेवार व्याख्यानमाले’त ते बोलत होते. ‘क्रांतीकारक सावरकर’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. शाहू स्मारक भवनमध्ये ही व्याख्यानमाला चालू आहे.
सोमण पुढे म्हणाले की, देश पारतंत्र्यात असतांना देशातील नागरिकांची होणारी कोंडी सोडवण्यासाठी जे क्रांतीकारक पुढे आले, त्यामध्ये सावरकर होते. सावरकरांनी देशाला संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्याचा ध्यास घेतला आणि ते लढ्यात उतरले. राष्ट्रभक्त संघटना स्थापन करून त्यांनी कार्य चालू केले. संघटनेत जे येतील, त्यांना घेऊन गुप्त पद्धतीने इंग्रज सरकारच्या विरोधात कारवाया केल्या. हे काम करत असतांना त्यांना अनेक वेळा इंग्रजांनी पकडले, अटकही झाली; पण त्यातून सुटून आल्यानंतर त्यांनी सरकारच्या विरोधातील कारवाया चालूच ठेवल्या. सावरकर हे कधीही ध्येयापासून बाजूला झाले नाहीत.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)