तुमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या, आता आरक्षण केव्हा मिळणार ? हे मुख्यमंत्र्यांना विचारा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबई – मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन ! सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आता केवळ आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणजे आपले मराठा बांधव आणि भगिनी यांनाही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल, ही अपेक्षा, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २७ जानेवारी या दिवशी ‘एक्स’वर पोस्ट करत मराठा आरक्षणासाठी लढा देणार्‍या मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करून आपले मत व्यक्त केले आहे.