
बेळगाव – पूर्वीच्या काळी भारतीय अध्यात्मशास्त्र अत्यंत प्रगल्भ होते. दुर्दैवाने आताच्या काळात हिंदूंना ‘उपवास का करावा ? देवतेला योग्य पद्धतीने नमस्कार कसा करावा ?’ हेही माहिती नाही. ते स्वत:च्याच मनाने साधना करत आहेत. त्यामुळे अापल्या जीवनातील संकटे, दु:ख न्यून होत नाही. समाजही धर्मपालन करत नसल्याने तो अधोगतीला गेला आहे. याउलट कलियुगात स्वतःच्या कुलदेवतेचे, तसेच श्री दत्तगुरूंचा नामजप केल्यास जीवनातील दुःखांचे निवारण होऊन तो आनंदाची अनुभूती अनुभवू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. बेळगावमधील नंदीहळ्ळी येथे लक्ष्मी मंदिरासमोर असलेल्या लक्ष्मी चौक येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करत होत्या. याचा लाभ ३५० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. या प्रसंगी व्यासपिठावर साधिका सौ. अर्चना घनवट उपस्थित होत्या.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमस्थळी सद्गुरु स्वाती खाडये यांनी प्रथम ग्रामदैवत श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले आणि नंतर कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
२. वर्ष १९९५ मध्ये याच ठिकाणी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन झाले होते.
Barabanki Conversion Traps : बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानांकडून चालू आहे हिंदूंचे धर्मांतर !
‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’त ३२५ हून अधिक तरुण-तरुणींनी घेतला सहभाग !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती !
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !