
मुंबई – वर्ष १९८७ मध्ये हिंदुत्वाचा प्रचार केला; म्हणून निवडणूक आयोगाने शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार ६ वर्षांसाठी काढून घेतला. आज मात्र निवडणूक आयोगाने आचारसंहितेत पालट केल्याचे आम्हाला वाटते. तसे असेल, तर निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
कर्नाटक राज्यातील निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करतांना ‘बजरंगबली की जय’ म्हणणयाचे आवाहन केले, तर काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी मध्यप्रदेशात भाजपला निवडून दिल्यास श्री रामललाच्या दर्शनासाठी विनामूल्य नेण्याची घोषणा केली. असे असेल, तर आम्हीही येत्या निवडणुकीत जनतेला आवाहन करतो की, ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’, ‘गणपति बाप्पा मोरया’ असे म्हणूनच मतदान करावे. वर्ष १९८७ मध्ये मुंबईतील पार्ले येथील पोटनिवडणुकीत आमच्याकडून रमेश प्रभु जिंकले होते. भाजप आमच्या विरोधात होता. ही पहिली निवडणूक आम्ही हिंदुत्वाच्या सूत्रावर जिंकली. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. तो योग्य होता कि आता पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री करत आहेत, ते योग्य आहे ? असा प्रश्न या वेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडणार्यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार !
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !