छत्रपती संभाजीनगर – यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वाधिक फटका मोसंबीच्या बागेला बसला आहे. मोसंबीसह अन्य फळबागा जगवणे अत्यंत जिकिरीचे ठरले आहे. पावसाअभावी विहिरी, तलाव आणि कूपनलिका कोरड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मोसंबीच्या बागा तोडत आहेत. पैठण तालुक्यातील कडेठाण येथील शेतकरी कल्याण तळपे यांनी १० वर्षांपूर्वी ३०० मोसंबीची लावलेली झाडे तोडली आहेत. पैठण तालुक्यातील अनेक गावांत आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकर्यांनी मोसंबी बागेवर चालवली कुर्हाड !
मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकर्यांनी मोसंबी बागेवर चालवली कुर्हाड !
नूतन लेख
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !
- भाजप १६० हून अधिक जागा लढण्याचे संकेत
- पुणे शहरांतील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक २८ घंट्यांनी संपली !