
गौहत्ती (आसाम) – छत्तीसगडमध्ये पुढील मासात असणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार चालू असून आसामचे भाजपचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केलेल्या एका टिप्पणीवरून त्यांना निवडणूक आयोगाकडून ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे.
१. सरमा कवर्धा येथील एका प्रचार सभेला संबोधित करतांना म्हणाले होते, ‘कुठे एखादा अकबर आला, तर १०० अकबरांना बोलावतो. त्यामुळे जेवढे लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर त्याला परत पाठवायला हवे, अन्यथा माता कौशल्यची भूमी अपवित्र होईल.’ माता कौशल्येची जन्मभूमी ही छत्तीसगडमध्ये असल्याचे म्हटले जाते. महंमद अकबर या एकमेव काँग्रेसी मुसलमान मंत्र्याच्या विरोधात सरमा यांनी वरील वक्तव्य केले होते.
२. छत्तीसगड राज्यात ९० सदस्य असणार्या विधानसभेत ७ आणि १७ नोव्हेंबर या दिवशी दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. ३ डिसेंबर या दिवशी मतमोजणी असणार आहे.
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah
Delhi-NCR : देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आक्रमणाचा कट उधळला
Petrol Bombs At RSS : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बाँब !
Badaun Rape : बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर वर्षभर बलात्कार
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !
श्री तुळजाभवानी (नवीन) बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवाशांची गैरसोय !