बांगलादेशी दलालासह १७ बांगलादेशी तरुणांना अटक

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – पोलिसांनी एका बांगलादेशी दलालासह १७ बांगलादेशी तरुणांना बनावट (खोट्या) कागदपत्रांसमवेत अटक केली आहे. हे सर्व बांगलादेशी नागरिक अवैध मार्गाने भारतामध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना िमळाली होती. बांगलादेशी दलाल सलमान अयुब खान या आरोपीने बांगलादेशी नागरिकांना अवैध मार्गाने मुंबईत आणले आहे. सर्व बांगलादेशी नागरिकांना त्याने बनावट पारपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि अन्य महत्त्वाची दिलेली कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहे. (घुसखोरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी पोलीस ‘कोबिंग आपॅरेशन’ कधी राबवणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका :

भारतात वारंवार होणारी अवैध घुसखोरी रोखण्यासाठी सरकार ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया’ कधी राबवणार ?