सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

श्री. चेतन राजहंस

वणी (यवतमाळ), २० ऑक्टोबर (वार्ता.) – सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळी षड्यंत्रे रचली जात आहेत. अशी षड्यंत्रे रचणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंच्या संघटित शक्तीचा कायदेशीर आघात करूया, असे वक्तव्य सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘मी सनातन धर्मरक्षक’ या अभियानांतर्गत वणी येथे झालेल्या सभेत केले.