हिंदु राष्ट्राची मागणी करणारे देशाचे शत्रू ! – मौर्य

  • समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना पुन्हा उठला हिंदुद्रोही पोटशूळ !

  • ‘महंमद अली जिना यांच्यामुळे नाही, तर हिंदु महासभेमुळेच देशाची फाळणी झाली’, असेही मौर्य यांचे अजब तत्त्वज्ञान !

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारत आणि पाकिस्तान यांची जी फाळणी झाली, त्यासाठी महंमद अली जिना नाही, तर हिंदु महासभा उत्तरदायी होती. हिंदु राष्ट्राची मागणी करणारे लोक हे देशाचे शत्रू आहेत, असे अश्‍लाघ्य वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे. उत्तरप्रदेशातील बांदा येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.

१. मौर्य पुढे म्हणाले की, भारताची घटना हे सांगते की, धर्म, जात, लिंग आणि जन्मस्थळ यांच्या आधारे कुठलाही भेदभाव करता येत नाही. जर कुणी ‘हिंदु राष्ट्र हवे’, अशी मागणी करत असेल, तर दुसरे लोकही तशी मागणी करणार नाहीत का ? याआधी हिंदु महासभेने हिंदु राष्ट्राची मागणी केली होती. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली. (भारताची फाळजी ही जिना आणि गांधी यांच्यामुळे झाली. हे सत्य नाकारणारे इतिहासद्रोहीच होय ! – संपादक)

२. याआधीही मौर्य यांनी हिंदुद्रोही वक्तव्य केली होती. ऑगस्ट २०२३ मध्ये मौर्य म्हणाले होते की, हिंदू हा कुठलाही धर्म नाही, तर तो केवळ एक धोका आहे. ब्राह्मणवादाची मुळे खूप खोलवर रुजली आहेत. समाजातील असमानतेचे कारण ब्राह्मणवाद आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु राष्ट्राची मागणी करणारे हे देशाला रसातळाला घेऊन जाणार्‍या, मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या आणि मौर्य यांच्या वक्तव्यांना खपवून घेणार्‍या धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालीचे विरोधक आहेत, हे लक्षात घ्या !
  • देशाचे इस्लामिस्तान करू पहाणार्‍यांच्या विरोधात मौर्य यांनी कधी काही बोलल्याचे एकिवात नाही !
  • हिंदूंमधील अतीसहिष्णुतेमुळेच मौर्य अशा प्रकारे वारंवार हिंदुद्रोही वक्तव्ये करत आहेत. बहुसंख्य हिंदूंच्या देशात एका मोठ्या राजकीय पक्षाचा एक नेता असे वक्तव्य करू धजावतो, हे हिंदूंसाठीच लज्जास्पद !
  • मौर्य यांना आता या ऐतिहासिक शोधासाठी पुरस्कारच द्यायला हवा !