गोव्यात ९ मासांत झालेल्या २ सहस्र ९० अपघातांत २१० जणांनी गमावले प्राण

(प्रतिकात्मक चित्र)

पणजी : राज्यात चालू वर्षी १ जानेवारी ते २५ सप्टेंबर या कालावधीत एकूण २ सहस्र ९० अपघात झाले. यामधील १९३ अपघात भीषण होते आणि अपघातांमध्ये एकूण २१० जणांचा मृत्यू झाला. आकडेवारीनुसार राज्यात दिवसाला सरासरी ८ अपघात होतात, तर प्रत्येक ३१ घंट्यांत एकाचा अपघातामुळे मृत्यू होत असतो.

१ जानेवारी ते २५ सप्टेंबर या कालावधीत वर्ष २०२२ मध्ये एकूण २ सहस्र १८७ अपघात झाले आणि १७८ जणांचा अपघातांत मृत्यू झाला.१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात एकूण १६३ अपघात झाले आणि यामध्ये ८ जणांना अपघाती मृत्यू झाला.