जालना येथील प्रकरणात पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करू ! – वैभव फडतरे, मराठा उद्योजक लॉबी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

नवी मुंबई, ३ सप्टेंबर (वार्ता.) – जालना येथे उपोषणकर्त्या मराठा बांधवांवर पोलिसांकडून लाठीमार करून उलट त्यांच्यावरच गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यांच्यावरील हे गुन्हे मागे घेऊन पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी ‘मराठा उद्योजक लॉबी’चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वैभव फडतरे यांनी वाशी येथे दिली आहे.

जालना येथे मराठा बांधवांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ नवी मुंबई मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.