
मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील घरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहेत. २१ जुलै या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला. याविषयी आराखडा सिद्ध करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने हा निर्णय घेतला आहे. विधानसभेत आमदार महेश बालदी यांनी रायगड येथील अन्य धोकादायक वाड्यांविषयीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. याविषयी रायगड येथील कर्नाळा गडाजवळील घेरावाडी, तसेच डोंगर कपार्यात वसलेल्या ५ वाड्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. आदिवासी विकासमंत्र्यांना याविषयीची सूचना देण्यात आली.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन