
मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील घरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहेत. २१ जुलै या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला. याविषयी आराखडा सिद्ध करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने हा निर्णय घेतला आहे. विधानसभेत आमदार महेश बालदी यांनी रायगड येथील अन्य धोकादायक वाड्यांविषयीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. याविषयी रायगड येथील कर्नाळा गडाजवळील घेरावाडी, तसेच डोंगर कपार्यात वसलेल्या ५ वाड्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. आदिवासी विकासमंत्र्यांना याविषयीची सूचना देण्यात आली.
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या कामाची पहाणी !