मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील घरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहेत. २१ जुलै या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला. याविषयी आराखडा सिद्ध करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने हा निर्णय घेतला आहे. विधानसभेत आमदार महेश बालदी यांनी रायगड येथील अन्य धोकादायक वाड्यांविषयीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. याविषयी रायगड येथील कर्नाळा गडाजवळील घेरावाडी, तसेच डोंगर कपार्यात वसलेल्या ५ वाड्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. आदिवासी विकासमंत्र्यांना याविषयीची सूचना देण्यात आली.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील घरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणार !
राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील घरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणार !
नूतन लेख
- श्रेया धारगळकर यांना तडीपार करा ! – संतप्त ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी
- ३ मासांपूर्वी मडगाव येथील श्री दामोदर सालात झालेल्या चोरीचा लागला छडा !
- महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॅफे बंद करण्यात येतील ! – शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त
- ठाणे येथे १ लाखाहून अधिक मतदारांची नावे मतदारसूचीत नसल्याचा आरोप !
- आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे नोंद !
- नाशिक येथे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर गुन्हा नोंद !